Saturday, October 1, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] विजयादशमी :-



---------- Forwarded message ----------
From: Keskar Vaibhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/10/1
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] विजयादशमी :-
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


विजयादशमी :- 'यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र...
Keskar Vaibhav 1:28pm Oct 1
विजयादशमी :-
'यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः,
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितीर्मतीर्माम||
योगेश्वर कृष्ण म्हणजे ईशकृपा आणि धनुर्धर पार्थ म्हणजे मानव प्रयत्न या दोहोंचा संगम होतो तेथे काय असंभव?तेथे विजयाचाच घंटानाद संभवतो हि निर्विवाद घटना आहे.
दसर्याचा उत्सव म्हणजे भक्ती आणि शक्ती ह्यांचा समन्वय समजावणारा उत्सव.नवरात्रीचे ९ दिवस जगदंबेची उपासना करून शक्ती प्राप्त केलेला मनुष्य विजय प्राप्तीसाठी येथे नाचू लागणे अगदी स्वभाविक आहे.आपली संकृती वीरतेची पूजक आहे.व्यक्ती आणि समाज यात वीरता प्रकट व्हावी ह्यासाठी दसर्याचा उत्सव आहे.
शत्रूने आपल्या राज्ज्यात घुसून लुटमार केल्यानंतर त्याचाशी लढाईची तयारी करण्याएवढे आपले पूर्वज नादान नवते.ते शत्रूचा दुर्व्यवहार कळताच शत्रूच्या सीमेवर अचानक हल्ला करीत.रोग व शत्रू यांना उत्पन्न होताच दाबले पाहिजे.एकदा जर त्यांनी हात पाय पसरवले कि निपटणे अवघड होते.

भगवान रामचंद्रांनी रावणावर मत करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले होते,छत्रपती शिवाजींनीही औरंगझेबला जेरीस आणण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचे रक्षण ivyकेले होते.आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत कि ,हिंदुराजे ह्या दिवशी विजय प्रस्थान करीत.
रघु राजाकडे वर्तन्तुचा शिष्य कौत्सा गुरुदाक्शिनेसाठी १४ कोटी सोन्याच्या मोहरा मागायला आला होता .सर्व दक्षिणा दान करून शरदाच्या मेघ प्रमाणे रघुराजा निष्कांचन झाला होता.
आपल्या कुलाच्या गौरवासाठी ते दान देण्याचे निश्चित करून त्याने कुबेराला सिमोल्लान्घानाच ultimatum दिला.घाबरून कुबेराने शमीच्या वृक्षावर सोन्याच्या मोहोरांचा पाऊस पाडला.
शमी वृक्षाने वैभव दिले म्हणून त्याचे पूजन होऊ लागले.पंदांनी आपली दिव्व्य अस्र shamivruksha var lapavun ठेवले म्हणून त्याचे महात्म्य वाढलेले आहे.
रघूने शमी वृक्षावर पावसाच्या रूपाने पडलेल्या सोन्याच्या मोहरा कौत्साला दिल्या .१४ कोटींपेक्षा अधिक घेणार नाही असा त्याने आग्रह धरला आणि तुझ्या निमित्ताने आलेली हि संपत्ती आहे तेव्हा अधिक झालेल्या संपत्तीने मी माझी तिजोरी भरणार नाही असा आग्रह रघूने धरला.वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह कदाचित केवळ भारतातच पाहायला मिळेल.जड असलेल्या मोहोर लोकांकडून लुटविल्या गेल्या.
सुवर्ण मोहोरांचे प्रतिक म्हणून आम्ही शामिपुजानानंतर शमीची पाने आपण एकमेकांना देतो.जे वैभव मिळाले आहे ते मी एकता भोगणार नाही ,आपण सर्व मिळून भोगू या .आपण वाटून खाऊ.केवढा उदात्त भाव!
दसर्याचा दिवस म्हणजे समाजात असलेल्या दि,हीन,लाचार तसेच भोग्वृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस.बाह्य शत्रुबरोबरच आत बसलेल्या षड्रिपूंवरविजय मिळविण्यासाठी कृतानिश्चायी बनण्याचा दिवस!
दसरा म्हणजे वीरतेचे वैभव ,शौर्याचा शृंगार,व पराक्रमाची पूजा!दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन!

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment